नाही माहित कुणाला
कधी अन् कशी ती शिरली
शिष्टाचारासारखी ती आता
जन मानसात रूळली
भ्रष्टाचाराची जुनीच किड ती
आता खोलवर रुजली
प्रतिष्ठीत मान्यवर सारी
चौकशीत मग सुटली
भ्रष्टाचाराने बरबटलेले हात
त्या साऱ्यांनी धुतले
आणि भ्रष्टाचार मिटविण्याचे
मग शपथेवर सांगितले
छोटे छोटे मासे ते
लागतात कधी गळाला
मोठ्यांना मात्र मिळते
संधी सहज पळायला
समाजसेवी कधी करतात
निर्धार लढण्याचा
पण अंदाज चुकतो त्यांचा
स्वतःच्या ताकदीचा
भ्रष्टाचार विरोधी खरी लढाई
कधी लढलीच नाही गेली
आणि न लढलेल्या लढाईची
आता चर्चा ही थांबली
साऱ्यांच्या मनातली ती व्यथा
माझ्या मनाला मात्र सलली
सांत्वना अभावी कशी
खोल काळजात रूतली
न लढलेली लढाई बिचारी
उपेक्षितच राहिली
मनाच्या कागदावर फक्त
एक कविता ती बनली…
रचना – डाॅ. सुभाष कटकदौंड- खोपोली