सोबत जगलो दोघं
मरण नाही चुकले कुणाला
पण तुझ्याविना जीवन
नाही कल्पवत ग मनाला
स्वभाव माझा चिडका
दोष देऊ कुणाला
हसत पित राहिलीस तू
अपमानाचा प्याला
नाही समजु शकलो मी
निर्मळ तुझ्या मनाला
आता तुझ्याशिवाय जीवन
नाही कल्पवत ग मला
तू नेहमी साथ दिलीस
स्वप्नं माझी रंगवायला
हात कमी पडले माझे
दूःख तुझं सावरायला
तू नेहमी घेतलंस ओंजळीत
खचलेल्या माझ्या मनाला
आज तुझ्याशिवाय जीवन
नाही कल्पवत ग मला
तू पहात होतीस नेहमी
उगवत्या प्रसन्न सूर्याला
मी न्याहाळायचो मनी
मावळत्या त्या चंद्राला
तुला कधी उदास पाहुन
यातना होतात ग मनाला
आता तुझ्याशिवाय जीवन
नाही कल्पवत ग मला
विसर राणी तू आता
कडव्या त्या क्षणाला
तू नेहमी दिलेस बळ
माझ्या या जगण्याला
तुझ्यानंतर कोण सावरेल
हळव्या माझ्या मनाला
तुझ्याविना हे जीवन
नाही कल्पवत ग मला
नियतीचे ते विधान
नाही चुकले ग कुणाला
तुझ्याविना काहीच अर्थ
नसेल माझ्या असण्याला
माझ्यातलं थोड आयुष्य
लाभु दे ग तुला
तुझ्याआधी ने मला
हेच मागणं त्या देवाला
तुझ्याविना हे जीवन
नाही कल्पवत ग मनाला
नाही कल्पवत ग मनाला
रचना – डाॅ. सुभाष कटकदौंड – खोपोली
I like this poem sir
LikeLike
its very heart touching poem …..keep it up …
LikeLike
खूप भारी आहे तुमची कविता ।।।।मला आवडली मी यावर एक ऑडिओ बनवू इच्छितो
LikeLike
Go ahead and send me clip
LikeLike
My number 9561284408
LikeLike
मला खुप आवडल कविता खुप सुंदर 👌👌👌👌😊
LikeLike
lay bhari poyam aahe madamji…..mast kavita aahe
LikeLike
sory sir ji….mast kavita aahe
LikeLike
कविता खूप सुदंर आहे, शब्दांचे अर्थ, केलेली शब्दरचना छान आहे
LikeLike